रायगड पृथ्वीवरील स्वर्गच
रायगड माझ्या राजाचं घर
माझा पहिला ट्रेक राजधानी रायगड,योग आला तो NSS मुळे दिवस होता २६ जानेवारी २०१९ देशाचा ७०वा प्रजासत्ताक दिन, या भेटेची सुरवात काही शब्दांनी करेन - सूर्या आधी नमस्कार पूर्व दिशेस करावा, शिवबा आधी दंडवत जिजामातेसी घालावा...
जय जिजाऊ जय शिवराय करत स्वराज्याची राजधानी कडे चढायला सुरुवात केली चढताना दिसले ते जावळीचे खोरे आणि सह्याद्रीचे उंच सुळके अंगावर शहारा, डोळ्यात निसर्ग आणि मनात फक्त महाराजांच्या भेटीची ओढ देवाच्या भेटीची ओढ होती की लावकारत लवकर गड चढला आणि पोहचलो महादरवाज्यात तेथूनच सुरू होतं ते देवघर, तिथून वर जाताच प्रथम दिसला तो हत्ती तलाव, तेथूनच थोडं पुढे गेलं की दिसतो तो गंगासागर तलाव गंगाभट्ट यांनी शिवराज्याभिकासाठी आणलेल्या सप्त नद्यांचे राहिलेलं पाणी या तलावा मध्ये सोडलं होत म्हणून नाव गंगासागर, यानंतर आम्ही पहिले होळीचे मैदान जिथे होळी पेटवल्यावरच ३६५ किल्ल्यांवर होळी पेटवली जायची आणि इथेच होळीतून नारळ काढायचा खेळ चालायचा आणि तो जिंकण्याचे धाडस होते ते फक्त सिंहाच्या छाव्या मध्ये म्हणजेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज,
यानंतर आमची पावले पडली ती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलवतंस राजाधिराज सिंहासनाधिश्वर राजनीती धुरंदर शास्त्रपारंगत राजमान्य राजश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेकडे, भव्य राजदरबार बघून आणि तेव्हा कसा दरबार भरत असेल या विचाराने अंगावर शहारे आले महाराजांचा सिंहासनावर गुडघ्यावर हात ठेवलेली मूर्ती डोळे भरून पहिली सिंहसनापुढे जाताच चित्त थाऱ्यावर नव्हते, अंग थरथरत होते, डोळ्यात पाणी, मान खाली आणि वर येत होते ते फक्त हाथ. राजाला मनाचा मुजरा करण्यासाठी तिथेच मी शिवगर्जना घेतली आणि पुढे २२० फुटांवर नगारा दरवाजा आपल्या राजांनी हे सदर असे बांधून घेतले होते की कोणत्याही कोपऱ्यातून अगदी हळू आवाजात बोललं तरी आपल्याला ऐकू यावं म्हणूनच म्हणतात ना रयतेचा राजा ते खरंच आहे,
तिथेच पुढे आपल्याला दिसतो तो पालखी दरवाजा जेथून महाराजांची विजयी पालखी आत यायची, बाजूला आपल्याला दिसतात २ मनोरे त्या दोन्ही मनोर्यांचे मिळून सात मजले असायचे अशी माहिती मिळाली, पालखी दरवाज्यातून वर येताच लागतात ते राणी महाल, तेथून बाहेर येताच मेणा दरवाजा, या नंतर दिसली ती धान्यांची कोठार आणि अष्टप्रधान मंडळाची दफ्तरे, एवढं सगळं पाहून क्षण आला होता तो मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा म्हणजेच महाराजांचा राहता महाल, महालाच्या बाजूला होते गुप्त बैठकीची खोली आणि महाराजांचे दफ्तर, महाराजांची झोपण्याची जागा पहिली आणि आठवले इथेच आपल्या देवाने अखेरचे श्वास घेतलेअसणार आणि मी माझ्या भरून आलेल्या मनाला डोळ्यातून वाट मोकळी करून दिली, हा प्रसंग माझ्यासाठी फारच भावनिक होता, महालापुढेच होती ती भव्य बाजारपेठ अतिशय व्यवस्थित बांधलेली पुढे गेलो आणि पाहिला टकमक टोक जिथून अपराध करणाऱ्यांचा च नव्हे तर वाईट विचारांचाही कडेलोट व्हायचा.
शेवटी गेलो ते जगदीश्वराच्या मंदिरात, तेथून बाहेर येताना पाहिले मोडी लिपी मध्ये लिहलेले ते नाव ज्यांच्या खांद्यावर संपुर्ण राजधानी बांधण्याची जबाबदारी होती म्हणजेच हिरोजी इंदुलकर तिथेच त्यांनी दिलेले हमीपत्र ही पाहिले त्यावरच मजकूर असा होता जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या गडाच्या एकही दगडाला काहीही होणार नाही जगदीश्वराचे दर्शन घेऊन मी गेलो महाराजांच्या समाधी स्थळावर तिथे नतमस्तक झालो थोडावेळ तिथेच बसलो आणि मागेच असणारी वाघ्या कुत्र्याची समाधी पाहून मी गड उतरण्यास चालू केल,
या नंतर आम्ही गेलो ते रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी अत्यंत शांत, सुंदर अशा ठिकाणी ही आऊसाहेब यांची समाधी आत प्रवेश करताच ममतेचा झरा काठ सोडून वाहू लागल्याचा भास झाला त्यागाचा समुद्र दिसला आणि प्रेरणेचा स्रोत मिळाला एक तुळशी वृंदावन आणि त्यामागे आऊसाहेबांची समाधी. थोडावेळ आऊसाहेबांच्या चरणी बसलो आणि भारताला च नव्हे तर संपूर्ण जगाला छत्रपती देणाऱ्या या आईला दंडवत करून मी निघालो ते माझ्या परतीच्या वाटेवर निघालो
तेव्हापासून मला ट्रेकिंग ची ओढ लागली आणि जवळ जवळ मी आत्तापर्यंत ९ गडकिल्यांवर जाऊन आलो थँक्स NSS
जाता जाता एकच विचार मनात आला जिथे जाऊन सर्व स्वार्थ संपतो आणि डोळ्यातून अश्रू येतात असा एकमेव देवघर म्हणजे श्रीमान रायगड-स्वराज्याची दुसरी राजधानी
शेवटी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्ती नसून आणि रायगड हा फक्त गड नसून, एक भावना आहे...✍️ शिवम शशिकांत म्हस्के (फिरस्ती)
#quarantinedays
#StayHomeStaySafe
Comments
Post a Comment