Skip to main content

गिरिदुर्ग एक सगा सोयरा - किल्ले राजमाची

सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
या महाराष्ट्र दिनी एकजूट होऊ आणि
करोना वर मात करू
जय जय महाराष्ट्र माझा,
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा २०२०



शोधुनी स्वर्ग धरतीवरी, भटकलो मी वाऱ्यापरी ...

झुकल्या गर्विष्ठ माना जिथे, जिव जडला सह्याद्रीवरी ...
सह्याद्री… 
आभाळाला भेदणारे अक्राळविक्राळ.. प्रचंड.. अतिप्रचंड.. डोंगर..!
वरुन खाली बघितलं तर थेट पाताळात घुसलेल्या दऱ्या..!
ताशीव कातळ कडे… गुढगंभीर गुहा-घळींनी ओतप्रोत भरलेला..
असा हा रौद्रभीषण सह्याद्री..!!
नवख्या माणसाला बघूनच धडकी बसावी.

पावसाळ्यात मात्र रंगीबेरंगी फुलांची वेलबुट्टी चित्तारलेली हिरवी शाल पांघरून हा सह्याद्री असाकाही नटतो, की याच्या राजबिंड्या रुपावरुन बघणाऱ्याची नजर हटूच नये..!
आणि सह्याद्रीचं हे राजस रुपडं पहायचं असेल तर एकदा राजमाचीला गेलंच पाहिजे.....



तर आम्ही ही गेलो होतो, योग असा आला, मी पुण्यात असताना, आम्ही रात्री रूम वर बसलो असता गप्पा मारत कि उद्या सुट्टी आहे तर कुठेतरी जायचा प्लॅन बनवू , मग मी, माझा मित्र पारस, ओंकार आणि गौरव असा आमचा ४ जणांचा किल्ले राजमाची ला जायचं ठरलं, रात्रीच आम्ही जे काही साहित्य लागणार ते सर्व २ बॅग मध्ये भरून ठेवलं आणि सकाळी लवकर निघायचं म्हणून आम्ही रात्री लवकरच झोपी गेलो, सकाळी आम्ही लवकर उठून आमचं सगळं आवरून ६ वाजता रूम मधून बाहेर पडलो, वार शनिवार तारीख १३ जुलै २०१९ आम्ही बस स्टॉप वर गेलो, तेथून आम्ही शिवाजीनगर स्टेशन ची बस पकडून स्टेशन ला पोहचलो, नंतर चौकशी केली ट्रेन कितीवाजता आहे बघून लोणावळा चे ४ तिकीट काढले आणि ट्रेन यायला वेळ असता आम्ही स्टेशन वरच नाष्टा केला, आणि खाऊन झाल्यावरच स्टेशन कडे गेलो शनिवार विकेंड असल्यामुळे आणि पावसाळा चालू असल्यामुळे सिझन मध्ये ट्रेकर्स ची गर्दी पण वाढते, तसेच पुण्यापासून लोणावळा जवळ असल्यामुळे लोणावळ्यानजीक भ्रमंती करण्यासाठी खूप किल्ले आणि पॉईंट्स आहेत, चला तर मग ट्रेन जशी अली आम्ही बसलो आणि अर्ध्या ते पाऊण तासात आम्ही लोणावळा स्टेशन वर पोहचलो.



स्टेशन वर उतरताच समोर बाहेर गेल्यावर किल्ले राजमाची च्या पायथ्यापर्यंत किंवा जेथून ट्रेकिंग चालू होते तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा तेथील लोकल च्या गाड्या आहेत, तर आम्ही ४ जण असल्यामुळे रिक्षा केली व पायथ्यापर्यंतचा  प्रवास रिक्षाने केला, रिक्षा जास्त वर पर्यंत जात नसल्यामुळे आम्हाला पायथ्यानजीक च्या गावापर्यंत सोडले तेथून चालू होतो आमचा किल्ले राजमाची कडे प्रवास...





" मंजिल मै क्या रखा है, चलीये सफर की बातें करते है......! "



हे गांव म्हणजे तुंगार्ली. रस्ता चांगला आहे गाड़ी रस्ता आहे, मग एक १५ ते २० मिनटात आम्ही एका डांबरी रस्त्याने चालत गेलो कि आम्हाला समोर तुंगार्ली धरणाची मोठी दगडी भिंत दिसली अणि ते धरण पार करून गेलं की तुंगार्ली गावात आम्ही पोहचलो गाव तस छोटंच पण तिकडून पुढे खरा हिरवागार वनांनी मस्त असा वेढलेला रस्ता चालू होतो. ह्याच रस्त्याने आजूबाजूचे निसर्गसौन्दर्य बघत आम्ही चालत राहिलो आजूबाजूचे निसर्गसौंदर्य खरंच अप्रतिम डोळ्यांना भुरळ पाडतीळ अशे धुक्यात लपलेले सह्याद्रीचे मोठे डोंगर दऱ्या मस्त, अर्ध्या पाऊण तासाने आम्ही आजूबाजूस विचारल्यावर आम्हाला असं सांगण्यात आलं कि आम्ही किल्य्याचा जवळ आलो आहोत, असच चालत राहिलो आम्ही थोडे पुढे गेल्यांनतर वाटेत आम्हाला आमच्यासारखेच बरेचसे ट्रेकर्स भेटले वीकेंड असल्यामुळे गर्दी होतीच चालत चालत आम्ही एका सुंदर धबधब्या जवळ कधी आलो कळलेच नाही, पाण्याचा आवाज ऐकून आम्ही ते दृश्य भान हरपून पाहू लागलो आणि त्या धबधब्याखाली जाऊन उभा राहिलो, नकळत हात मोबाईलमधील कॅमेरावर गेले आणि ते दृश्य आमच्या मोबाईल मध्ये कैद झालं....



श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले असलेला राजमाची हा महाराष्ट्रातला एकमेव किल्ला आहे या किल्ल्याची माहिती अशा प्रकारे आहे -


राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी Rajmachi Rural Aid and Development Programme या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कँपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे....




थोडावेळ थांबून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला अजून काही अंतर चालल्यानंतर आम्हला थोडी भूक लागली होती, आम्ही त्याचाच शोधात होतो पुढे गेल्यानंतर एक छोटासा हॉटेल दिसताक्षणी आम्ही धावत गेलो आणि गरमा गरम चहा घेतला आणि वडापाव खालले, पाउस तसा अधून मधून येत होता आम्ही अश्या ठिकाणी होतो कि डोळ्यांना सगळ्यात मोठ सुख देणारा कातलदरा धबधबा सह्याद्रीतून हा वाहणारा कातलदरा मनाला हिरावून टाकतो आणि त्याच माघे दिसत ते राजमाची बुरुज...


हे पाहिल्या बरोबरच आपण पोहचलो आहोत अगदी, थोड अंतर चालल्यानंतर आम्ही निसर्गाच्या सौंदर्याची मुक्त उधळण अनुभवत राजमाचीवरील उदेवाडी या छोट्या वस्तीत पोहोचलो. तिथे भारतीय पर्यटन विभागामार्फत माफक दरात पर्यटन कर घेतला जातो तो भरला. हा कर त्या भागाची सुरक्षा करणारे तसेच मार्गदर्शक यांच्यासाठी तसेच परिसराची साफसफाई ठेवण्यासाठी वापरला जातो. तिथून जवळच किल्ले राजमाची असा बोर्ड लिहिलेला दिसतो. दगडी बांधकामाच्या पायऱ्या आहेत त्यावरून चालत पुढे निघालो. पुढेच दोन श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरात भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या पुरातन मूर्ती आहेत, हे मंदिर तर म्हणजे या दोन किल्ल्यांच्या बरोबर मध्यात आहे आणि आजूबाजूला गर्द झाडी. खूपच मस्त असा हा भाग आहे. अगदी हा हिरवागार परिसर बघून डोळे तृप्त होतात. या मंदिरात रात्री आपण राहू शकतो. मंदिरासमोर काही जुन्या दीपमाळांचे दगडी अवशेष आहेत, येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन उजवी श्रीवर्धनला, मनरंजन उंचीने श्रीवर्धन पेक्षा लहान आहे, आणि त्या किल्यावर जाणारी वाट बरीच सोपी आहे, साधारण अर्ध्या तासात तुम्ही किल्याच्या प्रवेशद्वारा जवळ पोहचतो, राजमाची ला येणारी मंडळी फक्त श्रीवर्धनला जातात, चला तर मग आपला श्रीवर्धन कडील प्रवास चालू करूयात...



हि वाट मध्यम दर्जाची आहे. अगदीच सोपी हि नाही आणि अगदीच कठिण ही नाही, श्रीवर्धन चे बुरुज आणि तटबंदी अजून पण बऱ्याच  बऱ्या अवस्थेत आहेत, किल्यावर जानाऱ्या वाटेवर मध्ये एक गुहा आणि दोन पाण्याच्या टाक्या आहेत, या गुहा म्हणजे त्यावेळेसचे दारू गोळा साठवण्याचे कोठार, जीथे युद्धासाठीचे अम्युनेशन्स साठवायचे...

वीस पंचवीस मिनीटात आम्ही श्रीवर्धनच्या भव्य प्रवेशद्वारात पोहचलो  आत चालत गेल की आपल्याला काही पाण्याची टाकी, त्यासमोर एक धान्यकोठार, जरा बऱ्या स्थितीत असणारी तटबंदी दिसते. जरी शेवटची घटका मोजत पडलेला असा हे सगळा बांधकाम असला तरीही ते तेवढाच बळकट पण आहे, हे सर्व बघत आम्ही त्या बुरुजाजवळ पोहोचलो आणि तिथे पावसाला सुरवात झाली. वीस पंचवीस मिनिटे रिमझिम पाऊस पडत होता, शेवटी पाऊस थांबला बुरुजासमोर बघतोय, तो निसर्ग धुक्याची दुलई पांघरुन बसला होता. समोर काहीच दिसत न्हवते, जणू एखादी रमणी आम्हाला लाजून पदराआड लपली होती....इथून थोडा पुढे जरा चढून गेला की आपण अर्ध्या तासात माथ्यावर येतो. पठार सदृश दिसणारा हा माथा आणि त्यावरून दिसणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहून अगदी हरखून गेलो,




समोरचं दृश्य पाहून आम्ही भारावून गेलो, इथे एक ध्वजस्तंभ आहे. येथे महाराजांच्या स्वराज्याचा भगवा थाटात फडकतो, समोर दिसणाऱ्या ढाकभैरीचा सुळका आणि त्याच्या उजव्या बाजूला असणारा शिरोटाचा तलाव लिटरली हिप्नोटाईझ करून जातो, हिरवेगार डोंगर आणि सगळीकडून वाहणारे धबधबे खरंच हे सह्याद्रीच राजस रुपडं बघण्यासारखं आहे.... या जागेवरून तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळाला तर म्हणजे सोन्याहून पिवळे. ते सुख शब्दात बांधूच शकत नाही, तासभर तिथंच बसून होतो. निसर्गाचा तो सुंदर आविष्कार पाहून तिथून निघायची इच्छाच होत नव्हती.

शेवटी तो नजारा कॅमेर्‍यात आणि मनाच्या कुपीत कायमचा साठवून नाईलाजाने तिथून बाहेर पडलो.
राजमाचीचा आजूबाजूचा परिसर म्हणजे खूप इंट्रेसटिंग आणि एक्स्प्लोर करण्यासारखा आहे, राजमाची नक्कीच तुम्हाला डिसअपॉईंट नाही करणार....  
शिवम म्हस्के ( फिरस्ती )




पारस दोशी 
गौरव खैरनर 

ओंकार भुसारे 



आपल्यासोबतचे स्वराज्याचे शिलेदार 

शिवम म्हस्के ( फिरस्ती ) - स्वतः 
पारस दोशी 
ओंकार भुसारे
गौरव खैरनर




धन्यवाद 

जय जिजाऊ जय शिवराय 
#quarantinedays 
#StaySafeStayHome 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझं शिवबा राजं झालं

रणी फडकती लाखो झेंडे  अरुणाचा अवतार महा  विजयश्रीला श्रिविष्णूपरी  भगवा झेंडा एकचि हा ।। शिवरायाच्या दृढ वज्राची  सह्याद्रीच्या हृदयाचि  दर्या खवळे तिळभर न ढळे  कणभर काठी झेंड्याची  तलवारीच्या धारेवरती  पंचप्राणा नाचविता  पाश पटा पट तुटती त्यांचा  खेळे पट झेंड्यावरचा  लिलेने खंजीर खुपसता  मोहक मायेच्या हृदयी  अखंड हृधिरांच्या धारांनी  ध्वज सगळा भगवा होई ।। महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर चालू झाली होती... राज्याभिषेकासाठी कोणती अशी निश्चित परंपरा नव्हती, रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. साडेचार् हजार राजांना न...

रायगड पृथ्वीवरील स्वर्गच

रायगड पृथ्वीवरील स्वर्गच रायगड माझ्या राजाचं घर माझा पहिला ट्रेक राजधानी रायगड,योग आला तो NSS मुळे दिवस होता २६ जानेवारी २०१९ देशाचा ७०वा प्रजासत्ताक दिन, या भेटेची सुरवात काही शब्दांनी करेन - सूर्या आधी नमस्कार पूर्व दिशेस करावा, शिवबा आधी दंडवत जिजामातेसी घालावा... जय जिजाऊ जय शिवराय करत स्वराज्याची राजधानी कडे चढायला सुरुवात केली चढताना दिसले ते जावळीचे खोरे आणि सह्याद्रीचे उंच सुळके अंगावर शहारा, डोळ्यात निसर्ग आणि मनात फक्त महाराजांच्या भेटीची ओढ देवाच्या भेटीची ओढ होती की लावकारत लवकर गड चढला आणि पोहचलो महादरवाज्यात तेथूनच सुरू होतं ते देवघर, तिथून वर जाताच प्रथम दिसला तो हत्ती तलाव, तेथूनच थोडं पुढे गेलं की दिसतो तो गंगासागर तलाव गंगाभट्ट यांनी शिवराज्याभिकासाठी आणलेल्या सप्त नद्यांचे राहिलेलं पाणी या तलावा मध्ये सोडलं होत म्हणून नाव गंगासागर, यानंतर आम्ही पहिले होळीचे मैदान जिथे होळी पेटवल्यावरच ३६५ किल्ल्यांवर होळी पेटवली जायची आणि इथेच होळीतून नारळ काढायचा खेळ चालायचा आणि तो जिंकण्याचे धाडस होते ते फक्त सिंहाच्या छाव्या मध्ये म्हणजेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी ...