Skip to main content

माझं शिवबा राजं झालं

रणी फडकती लाखो झेंडे 
अरुणाचा अवतार महा 
विजयश्रीला श्रिविष्णूपरी 
भगवा झेंडा एकचि हा ।।
शिवरायाच्या दृढ वज्राची 
सह्याद्रीच्या हृदयाचि 
दर्या खवळे तिळभर न ढळे 
कणभर काठी झेंड्याची 
तलवारीच्या धारेवरती 
पंचप्राणा नाचविता 
पाश पटा पट तुटती त्यांचा 
खेळे पट झेंड्यावरचा 
लिलेने खंजीर खुपसता 
मोहक मायेच्या हृदयी 
अखंड हृधिरांच्या धारांनी 
ध्वज सगळा भगवा होई ।।




महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर चालू झाली होती...
राज्याभिषेकासाठी कोणती अशी निश्चित परंपरा नव्हती, रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.


साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले.


राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली "राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये, शिवा न्हावी कितीही जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.




राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली ” राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे.” राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला. तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली “राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. ” राजे धळाधळा रडू लागले.


साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू … तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजे आज आनंदाचा दिवस आणि तुम्ही रडताय. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे मला सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले ” राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे ? ” राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात ” हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको.”


स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.


जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य पुन्हा स्थापन आणि सक्षम करण्यासाठी जमेल तिथे जमेल त्या प्रकारे प्रयत्न करूयात.


"प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर"... हिंदवी स्वराज्य संस्थापक...
"राजाधिराज योगिराज" "पुरंधराधिष्पती" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत"...
"श्री" "श्री" "श्री"
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"
!!! जय भवानी जय शिवाजी !!!
आणि आमचं शिवबा राजं झालं रयतेला राजा मिळाला 🚩
म्हणूनच तर म्हणतात 
रायगड पृथ्वीवरील स्वर्गच
रायगड माझ्या राजाचं घर...



#एकच धून ६ जून
#शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
✍️ शिवम शशिकांत म्हस्के
( फिरस्ती शिवम )




Comments

  1. खुप छान शिवम... महाराजांचा इतिहास आणि महाराजांच्या जीवनातील महत्वाचे क्षण आणि त्यातुन निर्माण होणारी सामाजिक कार्याची प्रेरणा यातुन मिळेल.. अशाच समाजोपयोगी कार्यासाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील याची आशा करतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गिरिदुर्ग एक सगा सोयरा - किल्ले राजमाची

सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  या महाराष्ट्र दिनी एकजूट होऊ आणि करोना वर मात करू जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा २०२० शोधुनी स्वर्ग धरतीवरी, भटकलो मी वाऱ्यापरी ... झुकल्या गर्विष्ठ माना जिथे, जिव जडला सह्याद्रीवरी ... सह्याद्री…  आभाळाला भेदणारे अक्राळविक्राळ.. प्रचंड.. अतिप्रचंड.. डोंगर..! वरुन खाली बघितलं तर थेट पाताळात घुसलेल्या दऱ्या..! ताशीव कातळ कडे… गुढगंभीर गुहा-घळींनी ओतप्रोत भरलेला.. असा हा रौद्रभीषण सह्याद्री..!! नवख्या माणसाला बघूनच धडकी बसावी. पावसाळ्यात मात्र रंगीबेरंगी फुलांची वेलबुट्टी चित्तारलेली हिरवी शाल पांघरून हा सह्याद्री असाकाही नटतो, की याच्या राजबिंड्या रुपावरुन बघणाऱ्याची नजर हटूच नये..! आणि सह्याद्रीचं हे राजस रुपडं पहायचं असेल तर एकदा राजमाचीला गेलंच पाहिजे..... तर आम्ही ही गेलो होतो, योग असा आला, मी पुण्यात असताना, आम्ही रात्री रूम वर बसलो असता गप्पा मारत कि उद्या सुट्टी आहे तर कुठेतरी जायचा प्लॅन बनवू , मग मी, माझा मित्र पारस, ओंकार आणि गौरव असा आ...

रायगड पृथ्वीवरील स्वर्गच

रायगड पृथ्वीवरील स्वर्गच रायगड माझ्या राजाचं घर माझा पहिला ट्रेक राजधानी रायगड,योग आला तो NSS मुळे दिवस होता २६ जानेवारी २०१९ देशाचा ७०वा प्रजासत्ताक दिन, या भेटेची सुरवात काही शब्दांनी करेन - सूर्या आधी नमस्कार पूर्व दिशेस करावा, शिवबा आधी दंडवत जिजामातेसी घालावा... जय जिजाऊ जय शिवराय करत स्वराज्याची राजधानी कडे चढायला सुरुवात केली चढताना दिसले ते जावळीचे खोरे आणि सह्याद्रीचे उंच सुळके अंगावर शहारा, डोळ्यात निसर्ग आणि मनात फक्त महाराजांच्या भेटीची ओढ देवाच्या भेटीची ओढ होती की लावकारत लवकर गड चढला आणि पोहचलो महादरवाज्यात तेथूनच सुरू होतं ते देवघर, तिथून वर जाताच प्रथम दिसला तो हत्ती तलाव, तेथूनच थोडं पुढे गेलं की दिसतो तो गंगासागर तलाव गंगाभट्ट यांनी शिवराज्याभिकासाठी आणलेल्या सप्त नद्यांचे राहिलेलं पाणी या तलावा मध्ये सोडलं होत म्हणून नाव गंगासागर, यानंतर आम्ही पहिले होळीचे मैदान जिथे होळी पेटवल्यावरच ३६५ किल्ल्यांवर होळी पेटवली जायची आणि इथेच होळीतून नारळ काढायचा खेळ चालायचा आणि तो जिंकण्याचे धाडस होते ते फक्त सिंहाच्या छाव्या मध्ये म्हणजेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी ...